वारांची गीते - बुधवार

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ अभंग ॥ येथें उभा कां श्रीरामा । मनमोहन सेघश्यामा ॥धुर०॥ काय केली सीताबाई । येथें राही रखुमाई ॥१॥
काय केली अयोध्यापुरी । तेथें वसविली पंढरी ॥२॥
काय केली शरयू गंगा । येथें आणिली चंद्रभागा ॥३॥
धनुष्य बाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥
काय केलें वानरदळ । येथें मिळविले गोपाळ ॥५॥
रामीं रामदासीं भाव । तैसा होय पंढरिराव ॥६॥

॥ अभंग ॥ राम कृपाकर विठ्ठल साकार । दोघे निराकार एकारूपें ॥१॥
आमुचिये घरीं वस्ती निरंतरीं । हदयीं एकाकारी । राहियेलें ॥२॥
रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळू राघव पांडुरंग ॥३॥
जयजय पांडुरंग हरी ॥

॥ अभंग ॥ रामचरणाचा हाचि भावो । भक्तां दाखवावया ठावो । उभें राहाया अभि-प्रावो । भक्त खांद्या ध्यावया ॥१॥
विठोबा हे आमुची जननी । भीमातरिनिवासिनी । भक्त पुंडलिकालागुनी । वैकुंठींहुनि पातली ॥२॥
श्रीवत्साची हे खूण । तें भक्ताचें कृपा.

दान । आजानुबाहू यालागृन । भक्तां आलिंगन द्यावया ॥३॥
शोभे सुहास्यवदन ।  नाभी नाभी हें वचन । पूर्ण आकर्णनयन । साधुजन पहाया ॥४॥
मुकुटी मयूरपत्रें त्रिवळी । विट नीट असे ठाकली । रामदासाची माउली । भक्तालागीं उभी असे ॥५॥

॥ आरती ॥ निर्जरवर स्मरहरधर भीमातिरवासी । पीतांबर जघनीं कर दुस्तर भव-नाशी । शरणागत वत्सल पालक भक्तांसी । चाळक गोपीजनमनमोहन सुखरासी । जयदेव जयदेव जय पांडुरंगा । निरसी मम संगा नि:संगा भवभंगा ॥ जय० ॥१॥
आणिमा लधिमा गरिमा नेगति तव महिमा । नीलोत्पलदलविमला घननिलतनु श्यामा । कंटकभंजन साधू-रंजन विश्रामा । राघवदासा विगलितकामा नि:कामा ॥ जय० ॥२॥ ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP