करुणाष्टकें - अष्टक ६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


समाधान साधूजनाचेनि योगें । परी मागुतें दु:ख झालें वियोगें । घडीनें घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥१॥
घरें सुंदरें सौख्य नानापरीचें । परी कोण जाणेल तें अंतरीचें । मनीं आठवीतांचि तो कंठ दाटे । उदा० ॥२॥
बळें लवितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहीं केल्या पडेना । नव्हे धीर डोळां सदा नीर लोटे । उदा० ॥३॥
अवस्था मनीं लागली काय सांगूं । गुणीं गुंतलों हेत कोणासि सांगूं । बहूसाल भेटावया प्राण फूटे । उदा० ॥४॥
कृपाळूपणें भेटरे रामराया । वियोगे तुझ्या सर्व व्याकूळ काया । जनांमाजिं लौकीक हाही न सूटे । उदा० ॥५॥
अहारे विधी हें असें काय केलें । पराधीनता पाप माझें उदेलें । बहूतांमधें तूकतां तूक तूटे । उदा० ॥६॥
समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें । उदा० ॥६॥
समर्था मनीम सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें । उदा० ॥७॥
अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेट काया पडावी । दिसेंदीस आयुष्य हें व्यर्थ लोटे । उदा० ॥८॥
भजों काय सर्वा परी हीन देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा । म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदा० ॥९॥
म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघूनायका भक्तपाळा भुपाळा । पहावें तुला हें जिवीं आर्त मोठें । उदा० ॥१०॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP