अंतर्भाव - समास ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   
ऐक शिष्या सावधान । एकाग्र करोनि मन । पुससी अनु-संधान । अंतसमयींचें ॥१॥
अंत कोणास झाला । कोण मृत्यु पावला । हा तुवां विचारा केला । पाहिजे आतां ॥२॥
अंत आत्मयाच्या माथां । हें तों न घडे सर्वथा । स्वरूपीं मर- णाची वार्ता । बोलोंच नये ॥३॥
स्वरूपीं अंत नाहीं । येथें पाहणेम नलगे कांहीं । मृग-जळाचे डोहीं । बुडों नको ॥४॥
आतां मृत्यु देहास घडे । अचेतन बापुडें । शवास मृत्यु न घडे । कदा कल्पांतीं ॥५॥
आतां मृत्यु कोठें आहे । बरें शोधूनि पाहे । शिष्य विस्मित होवोनि राहें । एक क्षण निवांत ॥६॥
मग पाहे स्वामीकडे । म्हणे हा देह कैसा पडे । चालवितां कोणीकडे । निघोनि गेला ॥७॥
देह चालवितो कोण । हें मज सांगा खूण । एक म्हणती हा प्रान । पंचधारूपें ॥८॥
प्राणाची कोण चालवितां । येरू म्हणे स्वरूपसत्ता । सत्तारूपें तत्त्वतां । वाया जाण ॥९॥
मायेची मायिक स्थिति । ऐसें सर्वत्र बोलती । माया पाहतां आदिअंतीं । कोठें नाहीं ॥१०॥
अज्ञानास भ्रांति आली । तेणें दृष्टि तरळली । तेणें गुणें आढळली । नसतीच माया ॥११॥
शिष्या होई सावचित । मायेचा जो शुद्ध प्रांत । तोचि चौंदेहांचा अंत । सद्रुरुबोधें ॥१२॥
चार देहांच्या अंतीं । उरे शुद्धस्वरूप- स्थिति । तेणें गुणें तुझी प्राप्ति ।तुजला झाली ॥१३॥
जन्मलचि नाहीं अनंत । तयासी कैंचा येईल अंत । आदि निवांत । तोचि तूं अवघा ॥१४॥
स्वामी म्हणती शिष्यासी । आतां संदेह धरिसी । तरी श्रीमुखावरी खासी । निश्चयेंसी ॥१५॥
देहबुद्धीचेनि बळें । शुद्धज्ञान झांकोळे । भ्रांति हदयीं प्रबळे । स्मदेहरूप ॥१६॥
म्हणोनि देहातीत जें सुख । त्याचा करावा विवेक । तेणें गुणें अविवेक । बाधूं न शके ॥१७॥
तुटलें संशयाचें मूळ । देहचि मिथ्या समूळ । तयासि अंत हें केवळ । मूर्खपण ॥१८॥
जे जन्मलेंचि नाहीं । त्याची मृत्यु कैंचा काई । मृगजळाच्या डोहीं। बुडों नको ॥१९॥
मनाचा करोनियां जयो । स्वरू-पाचा करावा निश्चयो । दृढनिश्चयें अंतसमयो । होवोनि गेला ॥२०॥
आदि करोनि देह- बुद्धि । देह टाकिला प्रारब्धीं । आपण देहाचा संबंधी । मुळींच नाहीं ॥२१॥
असतें करोनि वाव । नसत्याचा पुसोनि ठाव । देहातीत अंतर्भाव । असो खुणेनें ॥२२॥
हें समाधान उत्तम । असतेपणाचें जें वर्म । देहबुद्धीचें कर्म । तुटे जेणें ॥२३॥
आतां तुटली आशंका । मार्ग फुटला विवेका । अद्वैतबोधें रंका । राज्यपद ॥२४॥
तंव शिष्यें आक्षेपिलें । आतां स्वामी दृढ झालें । तरी हें ऐसेंच बाणलें । पाहिजे कीं ॥२५॥
निरूपणीं वृत्ति गळे । शुद्धज्ञान तें प्रबळे । उठेनि जातां मावळे । वृत्ति मागुती ॥२६॥
सांगा यासी काय करूं । मज सर्वथा नसे धीरू । ऐका सावध विचारू । पुढील अव्यायी ॥२७॥
इति श्रीअंतर्भाव० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP