अंतर्भाव - समास ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   
प्राप्त झालें ब्रह्मज्ञान । बाणलें पाहिजे पूर्ण । म्हणोनि हें निरू पण । सावध ऐका ॥१॥
कांहींच नेणें तो बद्ध । समूळ क्रिया अबद्ध । भाव वाढविला शुद्ध । मुमुक्षु जाणावा ॥२॥
कर्में त्यजोनि बाधक । शुद्ध वर्ते तो साधक । क्रिया पालटे विवेक । निष्कलंक तेव्हां ॥३॥
तये क्रियेचें लक्षण । आधीं स्वधर्मरक्षण । पुढें अद्वैतश्रवण । केलें पाहिजे ॥४॥
नित्यनेम दृढ चित्तीं । तेणें शुद्ध चित्तवृत्ति । होवोनि भगवंतीं । भाग फुटे ॥५॥
नित्यनेमें भ्रांति फिटे । नित्यनेमें संदेह तुटे । नित्यनेमें लिगटे । सामाधान अंगीं ॥६॥
नित्यनेमें अतंर शुद्ध । नित्यनेमें वाढे बोध । नित्यनेमें बहु खेद । प्रपंची तुटती ॥७॥
नित्यनेमें सत्व चढे । नित्यनेमें शांति वाढे । नित्यनेमें थारा मोडे । देहबुद्धीचा ॥८॥
नित्यनेमें दृढभाव । नित्यनेमें भेटे देव । नित्यनेमें पुसे ठाव । अविद्येचा ॥९॥
नित्यनेम करूं कोण । ऐसा शिष्यें केला प्रश्र । केलें पाहिजे श्रवण । प्रत्ययाचें ॥१०॥
मानसपूजा जप ध्यान । एकाग्र करोनियां मन । त्रिकाळ घ्यावें दर्शन । मारुती सूर्याचें ॥११॥
हरि-कथानिरूपण । प्रत्यहीं करावें श्रवन । निरूपणीं ऊणखूण । केएले पाहिजे ॥१२॥
संकटीं श्रवण न घडे । बळात्कारें अंतर पडे । तरी अंतरस्थिति मोडे । ऐसें न कीजे ॥१३॥
अंत-रींच पांच नामें । म्हणत जावीं नित्यनेमें । ऐसें वर्ततां श्रमें । बाधिजेना ॥१४॥
ऐसी साध-काची स्थिति । साधकें रहावें या रीती । साधनेंवीण ज्ञानप्राप्ति । होणार नाहीं ॥१५॥
तंव शिष्य म्हणे जी ताता । जन्म गेले साधन करितां । कोणे वेळे पावों आतां । समाधान ॥१६॥
कैसें येईल सिद्धपण । केव्हां आतुडेल समाधान । मुक्तदशा सुलक्षण । मज केवीं प्राप्त ॥१७॥
आतां याचें प्रत्युत्तर । श्रोतीं व्हावें सादर । ऐका पुढें सविस्तर । आदरें करोनी ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP