मानसपूजा - प्रकरण ८

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
दुधें तुपें आणविलीं । दव्यें तक्रे आणविलीं । लोणचीं रायतीं काढिलीं । मेतकुटें ॥१॥
नाना काचर्‍या तळिल्या । कोथिंबीर सिद्ध केल्या । नाना शिखरिणी झाल्या । द्रोण पानें पत्रावळी ॥२॥
ब्राह्मण स्नान करोनि आले । एक देवार्चना बैसले । एक ते करूं लागले । वेदघोष ॥३॥
चित्रविचित्र सोवळीं । सुरंग नेसले प्रावर्णें केलीं । कित्येकीं देवार्चनें मांडलीं । ठांई ठांई ॥४॥
एक ध्यानस्थ बैसले । एकीं जप आरंभिले । एक करिते झाले । प्रदक्षिणा नमस्कार ॥५॥
पंचामृतें सांग पूजा । ब्राह्मणीं आरंभिली ओजा । राम त्रैलोक्याचा राजा । अर्पिते झाले ॥६॥
नाना सुगंधिक तेलें । मंगळ स्नान आरंभिलें । अंग पुसोनि नेसविलें । पीत वस्त्र ॥७॥
नान वस्त्रें अलंकार । गंधाक्षता कुंकुम केशर । उटी देवोनि माळा हार । उदंड घातले ॥८॥
उदंड उधळिलीं धूसरें । वाद्यें वाजती मनोहरें । गर्जती जयजयकारें । करताळी नामघोष ॥९॥
धूप आरती आरंभिली । उदंड नीरांजनें चालिलीं । भक्तजनें सुखी केलीं । दानपत्रें ॥१०॥
जितुकीं अन्नें सिद्ध केलीं । तितुकीं देवांपुढे ठेविलीं । उदकें ठेवोनि सोडिलीं । पट्टकूळेम ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP