मानसपूजा - प्रकरण ६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   ॥
इकडे स्वयंपाक चाली लविले । पारपत्य स्नान करोनि आले । देवदर्शन घेऊनि समर्पिले । खाद्य नैवेद्य ॥१॥
तोचि प्रसाद घेवोनि आले । पारपत्य फराळा बैसले । कित्येक ब्राह्मणहि मिळाले । निराश्रयी ॥२॥
इकडे धर्मशाळा असती । तेथें घातल्या पंगती । न्यायनीतीनें वाढती । दीर्घपात्रीं ॥३॥
लवण शारवा कोशिंबिरी । सांशगे पापड मिरघाटे हारी । मेतकुटें नेलचटें परोपरी । नाना काचर्‍या ॥४॥
फेण्या फुग्या गुरवळया वडे । घारगे गुळवे दहिंवडे । लाडू तिळवे मुगवडे । कोडबोळीं अनारसे ॥५॥
उदंड दुधें आणविलीं । तक्रें रुचिकरें करविली । दाट दह्यें सो केलीं । पात्रें भरूनी ॥६॥
ओळी द्रोणांच्या ठेविल्या । नाना रसीं पूर्ण केल्या आई शर्करा घातल्या । नाना सोज्या ॥७॥
थिजलीं आणि विघुरलीं । घृतें उदंद रिचविलीं । उदकें भरोनि ठेविलीं । निर्मळ शीतळ सुवासें ॥८॥
सुंठ भाजली हिंग तळिला । कोथिंबिरी वांटूनि गोळा केला । दधीं तक्रीं कालविला । लवणेंसहित ॥९॥
बारीक परिमळिक पोहे कुटटा उत्तम लाह्यांचा सुंदर कुट्टा । उत्तम दधीं घालून चोखटा । मुदा केल्या ॥१०॥
यथासाहित्य फलाहार केले । चूल भरून विडे घेतले । पुन्हां मागुते प्रवर्तले । कार्यभागासी ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP