मानसपूजा - प्रकरण २

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  ॥
आतां पारिपत्य ऐकावें । उत्तम गुणाचें आघवें । जयांस देखतां मानवे । विश्वलोक ॥१॥
धीर उदार सुंदर । दक्ष व्युत्पन्न चतुर । सकळ प्रयत्नीं तत्पर । अत्यादरें ॥२॥
दूरदृष्टी दीर्घप्रयत्नी । समय प्रसंग जाणे चिन्हीं । नासला फड नेटका वचनीं । बोलोन करिती ॥३॥
जाणती दुसर्‍याचें अंतर । सावधानता निरंतर । नेमस्त न्यायाचें उत्तर । बाष्कळ नाहीं ॥४॥
पवित्र वासनेचे उदास । केवळ भगवंताचे दास सारासारविचारें वास । हदयीं केली ॥५॥
अगाध अव्यग्र धारणा । मिळोनि जाती राजकारणा । कार्यभागाची विचारणा । यथायोग्य योजिती ॥६॥
न्याय नीति मर्यादेचा । स्नानासंध्या पवित्र तेजा । सत्यवादी बहुत ओजा । अन्याय क्षमित ॥७॥
चुकणें विसरणें असेना । मत्सर पैशून्य दिसेना । कोप क्षणिक असेना । निरंतर ॥८॥
हरिकथानिरूपण । तेथें प्रेमळ अंत:करण । पाहों जातां उत्तम लक्षण । उत्तम असे ॥९॥
ऐशा प्रकारचें पारपत्य । करूं जाणती सकळ कृत्य । धन्य धन्य कृतकृत्य । नि:कामतेनें ॥१०॥
ऐसे भले परमार्थी । श्रवण मनन अर्थाअर्थीं । जे परलोकींचे स्वार्थी । परोपकारी ॥११॥
॥ इति श्रीमानस. ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP