अन्वयव्यतिरेक - दशम: समास:

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥
अव्याकृति कारणदेह । ईश्वराचे नि:संदेह । तूं नव्हे परमात्मा अक्रिय । निश्चयेंसी ॥१॥
महत्तत्त्व गुणक्षोभिणी । अष्टधा प्रकृति त्रिगुणी । पंचभूतें ज्या-पासुनी । प्रगट जाहली ॥२॥
इच्छा सृष्टयादिक कर्माची । तेही दशा अव्याकृतीची । तेथें अवस्था प्रळयाची । शास्त्रीं बोलिली ॥३॥
अभिमानी त्रिनयन । महाकारण मात्रा तमोगुण । जें केवळ विस्मरण । स्वरूपाचें ॥४॥
स्वरूप विसरलेपणें । जियेसी लागे जडत्व येणें । त्यासी स्वरूप निर्गुणें । कैसें म्हणावें ॥५॥
पृथ्वीपासोनि महत्तत्त्ववरी । प्रळयो द्वय अवधारी । तें स्वरूप निर्धारीं । कैसें म्हणावें ॥६॥
म्हणूनि अव्याकृतीवगेळा । आत्मा जन्मकर्मानिराळा । तेचि कथा प्रांजळ प्रबळा । सावध ऐका ॥७॥
जे मुळींची मूळप्रकृति । ईश्वराची ज्ञान-शक्ति । तोचि महाकारण व्यक्ति । वेगळा आत्मा ॥८॥
अहंब्रह्मास्मि ऐसें ज्ञान । महाकारण-देहाचेम लक्षन । अर्धमात्रा शुद्धसत्वगुन । ईश्वर अभिमानी ॥९॥
सर्वसाक्षी अवस्था । प्रत्यक्ष पाहा विचारितां । निर्गुणावेगळें अनुभवितां । अनिर्वाच्य तें ॥१०॥
म्हणून अष्टदेहां -वेगळा । तूं ब्रह्म अनिर्वाच्य निर्भळा । महावाक्यार्थ अवलीळा । बोलिला असे ॥११॥
सोहं हंसा तत्त्वमसी । तूं ब्रह्म तें आहसी । अष्टदेहांच्या निरासीं । अनिर्वाच्य ॥१२॥
चत्वार देह जिवाचे । असती चारी ईश्वराचे । निरसितां स्वरूप उभयतांचें । अनिर्वाच्य ॥१३॥
तंव शिष्य म्हणे स्वामी समर्था । प्रकृतिपुरुषांची अभिन्नता निरूपिली तत्त्वतां । स्वमुखेंसी ॥१४॥
ईश्वर माया एकरूपता । ऐसें आपणचि सांगतां । मागुती असें म्हणतां । प्रकृतिवेगळा ॥१५॥
आणिक एक पुसत । पंचम प्रकार नासत । ऐसा बोलिला निश्चतार्थ । शास्त्रसिद्धांतीं ॥१६॥
या चहूंवेगळें पांचवे । नास्तिक शून्य तयातें म्हणावें । आणि स्वामी बोलिलें स्वभावें । चुतर्थ देहातात ॥१७॥
ऐसी सूक्ष्म आशंका । पाहतां प्रश्र केला निका । सावध होऊनि ऐका । विचार याचा ॥१८॥
पुरुष प्रकृति एक होय । ऐसा नियमचि आहे । परि हें सांगू नये । साधकासी ॥१९॥
त्यासी प्रत्यक्ष माया हे । झाली ऐसी वाटली आहे । म्हणूनि सांगणें होय । मायेवेगळा देव ॥२०॥
माया ब्रह्म एक म्हणतां । बुडेल सत्य स्वरूपाची वार्ता । ब्रह्मज्ञान स्वरूपसत्ता । कोण पुसे ॥२१॥
माया ब्रह्म एक जालें । तरीं संतसंगें काय केलें । वेदशास्त्रीं साधन बोलिलें । माया निरसाव याकारणें ॥२२॥
रज्जूचा सर्प नाहीं झाला । भ्रमें झालासा वाटला । म्हणूनियां अज्ञान्याला । ज्ञानदीप पाहिजे ॥२३॥
तैसी माया मुळीं जाहालीच नाहीं । केवळ वस्तूचि असे पाही । हरिसंकल्प तोही । समूळ मिथ्या ॥२४॥
जैसी माया नाथिली । तैसी ईश्वरत्व हे बोली । ऐसी अनिर्वाच्य खोली । जाणतीं स्वानुभवी ॥२५॥
मायेचें खरेपण वाट लें । म्हणूनि ईश्वरसाक्षी म्हणितलें । जाणीव इच्छा बोलिलें । बहुतां प्रकारे ॥२६॥
वायु प्रकृति जाणीव ईश्वर । असा प्रबोधकार । साक्षी सत्ता निर्धार । तयासी म्हणिजे ॥२७॥
ते माया निरसितां । निरसे साक्षी जाणतां । अनुभव आणि अनु-भविता । दोन्ही नाहीं ॥२८॥
प्रकृति आणि पुरुष । दोन्ही मायेचा विलास । ते निरसितां द्वयभास । अनिर्वाच्य ॥२९॥
ऐसी एकी आशका । फिटली आतां दुजी ऐका । सावध होऊनि विवेका । अवलोकावें ॥३०॥
इतिश्री व्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । स्वामी-कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥३१॥
इति दशम: समास: ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP