स्फुट श्लोक - श्लोक ४७ ते ५०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


४७
रुणानुबंद तों घडे । पुढें समस्त वीघडे । पशु मनुष्य संपदा । घडोन वीघडे सदा ॥१॥
भरोंव लागतां भरे । भरे कदापि नावरे । सवें चि वोसरे सरे । सरें चि तें कदा नुरे ॥२॥
बरीच वेळ लागतां । घडोन ये न भागतां । उगाच काळ विषमु । पराक्तमुच तो श्रमु ॥३॥
बराचि काळ तो बरा । न मागतांचि ये घरा । बळेंचि लोक बोलती । सुखें सुखी कल्लोळती ॥४॥
उदास राहातां गती । भले विवेक सांगती । घडेल तें सुखें घडो । पडेल तें सुखें पडो ॥५॥
४८
बहुगळा रसागळा । विशेष रंग आगळा । कळा कळा चि कोकिळा । पशु स्वरें चि वीकळा ॥१॥
श्रीकृष्ण विष्णु माधवें । मुरेंद्र चंद्र यादवें । जनासि ब्रह्म बोधिलें । प्रकुर्तीमान शोधिलें ॥२॥
प्रचीत सद्य प्रत्ययो । स्वीहत गद्य हो जयो । विचार धन्य धन्य रे । विवेक विश्वमान्य रे ॥३॥
प्रशस्त मस्त हस्तसे । बहुत खस्त वेस्तसे । असंख्य संखितां नये । रवीकुळोद्भंवा जये ॥४॥
नव्हे जनासि गद्य रे । नव्हे चि गद्य पद्य रे । स्वरूप तें चि सद्य रे । प्रशम्तसें प्रपद्य रे ॥५॥
४९
नसोन जाणती कळ । कळा समस्त वीकळा । परांतरासि नेणवे । तयासि काय जाणवे ॥१॥
परामतरासि जाणता । नसेल तो मुळीं रिता । सिकोन काय सीकलें । विकोन काये वीकलें ॥२॥
भला भला विचक्षणु । प्रवीण योग्य तीक्षणु । खुणावितां खुणावला । मनें खुणेसि पावला ॥३॥
बहुत धूर्त तो भला । खुणेसि तूर्त पावला । न सागतां जया कळे । निरोआपतां चि नीवळे ॥४॥
अखंड हेत पालटे । कळेचिना मनु विटे । सुरंग ना विरंगसे । उगेचि रंग भंगसे ॥५॥
५०
बहुत जाणती कळा । कळाचि होत वीकळा । कळोन ही कळेचिना । वळोन ही वळेचिना ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP