पंचक - क्षोभपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
करितां सांभाळ आपुला ।
दु:खें जीव भांबावला ॥१॥
पाहों जातां सारासार ।
कांहीं कळेना विचार ॥२॥
लोभें वृत्ति लांचावली ।
क्षोभें वृत्ति जाजावली ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
कोण उपाय करणें ॥४॥
॥२॥
संग स्वार्थाचा धरिला ।
तेणें काम बळावला ॥१॥
थोरपणें हे मातले ।
तेणें अव्हाटीं घातलें ॥२॥
कामाभागें आला क्तोध ।
क्रोधें केला बहू खेद ॥३॥
लोभ दंभाचें कारण ।
मोहें केलें विस्मरण ॥४॥
कामीं लांचावलें मन ।
झालें बुद्धीचें पतन ॥५॥
दास म्हणे हो सकळ ।
अवघे अविद्येचें मूळ ॥६॥
॥३॥
गेला प्रपंच हातींचा ।
लेश नाहीं परमार्थाचा ॥१॥
दोहींकडे अंतरलों ।
थोरपणें भांबावलों ॥२॥
गेली अवघी निस्पृहता ।
नाहीं स्वार्थही पूरता ॥३॥
पूर्ण झाली नाहीं आस ।
इकडें बुडाला अभ्यास ॥४॥
दास म्हणे क्तोधें केलें ।
अवघें लाजिरवाणें झालें ॥५॥
॥४॥
उगमीं विषें कालवलें ।
तेंचि प्रवाहीं पडलें ॥१॥
आतां कोणेकडं जावें ।
कोण्या प्रकारें असावें ॥२॥
होता भूषणाचा ठावो ।
तेथें जहाला अभावो ॥३॥
मूळ अंतरीं तें वेडें ।
जहालें अवघेंचि वांकडें ॥४॥
छाया शांतीची नावडे ।
क्रोधवणवा आवडे ॥५॥  
रामदास म्हणे जल्प ।
झाला अंतरीं विकल्प ॥६॥
॥५॥
सन्निपाताचें लक्षण ।
अवघें झालें कुलक्षण ॥१॥
जन कोणीच नावडे ।
प्राणी विकल्पें वावडे ॥२॥
आसवाची बडबडी ।
होऊं पाहे देशोधडी ॥३॥
प्राणी क्रोधें पिसाळलें ।
त्यास कोण म्हणे भलें ॥४॥
मना आलें तें करावें ।
बळेंचि अव्हाटीं भरावें ॥५॥
रामदास म्हणे खरें ।
ज्याचें त्यासी वाटे बरें ॥६॥
॥६॥
अधिक बोलॅचि नेदिती ।
धरूनि जीभचि कापिती ॥१॥
तेथें चालेना कीं ताठा ।
पोटासाठीं देशवटा ॥२॥
हात पाय ते कापिती ।
कर्ण नासिक छेदिती ॥३॥
नानाप्रकारीं यातना ।
अवघें श्रत आहे जना ॥४॥
दास म्हणे सेवाचोर ।
साहेबाचे हरामखोर ॥५॥

॥अभंगसंख्या ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP