पंचक - मलिनपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
महादर्पण खतलें ।
तेणें मुख आच्छादिलें ॥१॥
तैसी वृत्ति हे मळिन ।
होतां बुडे समाधान ॥२॥
धातुवरी आला मळ ।
तेणें लोपलें निर्भळ ॥३॥
शेतीं न जातां आडत ।
तेणें आच्छादलें शेत ॥४॥
मुखें न होतां उच्चार ।
तेणें बुडे पाठांतर ॥५॥
नाहीं दीपाचा विचार ।
दास म्हणे अंधकार ॥६॥
॥२॥
आत्मज्ञानी आहे भला ।
आणि संशय उठला ॥१॥
त्यासि नामचि कारण ।
नामें शोकनिवारण ॥२॥
नानादेश केले जनीं ।
अनुताप आला मनीं ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
जया स्वहित करणें ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥१०॥


Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP