कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ३

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


यैसे विचारी मानसी ॥ तंव आश्रीनी बोलिली आकाशीं आरे कंसा परियेसी ॥ सांडी गर्व पद ॥९२॥
आरे तुझी देवकी बहिन ॥ तीली पुत्र होईल जाण ॥ त्याचेयां हातें मरण ॥ पावसील तुं ॥९३॥
तो तुझा करिल संहारू ॥ बंधुसहित सकळ वीरु ॥ हे आश्रीणी बोलोनी उत्तरु ॥ सवेची आद्दश्य जाहली ॥९४॥
तो शब्दु आईकिला सकळा जनीं ॥ मग रावों खोचला आंतक्रनी ॥ ते व्हेळे कांपीनली धरणी ॥ दीसा कानवडलीयां ॥९५॥
तटस्त राहिले सकळ वीर ॥ गर्वां जाला परिहार ॥ न पुसती उत्तर ॥ येकमेकासी ॥९६॥
मग रावो म्हणें केसीया वीरा ॥ आणि प्रधाना आक्रुरा ॥ यासी कांहीं प्रतिकार करा ॥ चुकवा मरणा तें ॥९७॥
तवं बोले मंत्रीया सिरोमणी ॥ देवकी वसुदेव आणावी धरूनी ॥ त्यांसी बंधन करुनि ॥ रक्षणें ठेविजे ॥९८॥
येक म्हणती रायास आनो हित ॥ ते बाहिणीचे कायसे कवतीक ॥ मग पाठउनि दूत ॥ उभी वर्गें आनविली ॥९९॥
मग दोघां जोडूनी सांखळा ॥ थोरी केली आवकळा ॥ बंधी घातली ते वेळा ॥ निबंध रक्षणाईते ठेविलें ॥१००॥
येमळार्जुनु पीपळु जाला ॥ तो ते आंगणी उगवला ॥ त्यांवरी कागासुरु बैसला ॥ द्वारी राहिला गंधर्व ॥१०१॥
पींपळें झडझडावें ॥ कागासुरें गर्जावें ॥ गंधर्वे भुंकावें ॥ ते आईकाबे माहांद्वारी ॥१०२॥
तेथें ठेविली जेंगटें ॥ ते पीटुनि कीजे बोभस्टे ॥ कोण होतां यैकवटे ॥ इतुकाजनीं गर्जावें ॥१०३॥
हे परिसोनु कंसासुरु ॥ त्यां बाळकांचा करी संव्हारू ॥ यैसा संप्रधारू ॥ केला तिये वेळे ॥१०४॥
तंव रावो म्हणें वरें जाले ॥ आतां विघ्न टळले ॥ भाट बंधीजन सुखीया केलें ॥ धन वांटिलें ब्राह्मणासी ॥१०५॥
सकळांसी आनंदु जाला ॥ म्हणती हा विचारू वरवा केला ॥१०५॥
रावो मरणा चुकविला ॥ आतां भये नाहीं ॥१०६॥
माग (स) भा विसर्जली ॥ सकळां पेठवणी जाली ॥ पुढां कथा कैसी वर्तली ॥ ते सांघैल कृष्णदासु ॥१०७॥

॥ प्रसंग तिसरा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP