मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अश्‌शाम्य

सूरह - अश्‌शाम्य

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने १५)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

सूर्य आणि त्याच्या उन्हाची शपथ आणि चंद्राची शपथ जेव्हा तो त्याच्या पाठीमागे येतो. आणि दिवसाची शपथ जेव्हा तो (सूर्याला) स्पष्ट करतो आणि रात्रीची शपथ जेव्हा ती (सूर्याला) झाकून घेते, आणि आकाशाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला उभारले, आणि पृथ्वीची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने तिला अंथरले आणि मानवी जीवाची व त्या अस्तित्वाची शपथ ज्याने त्याला नीटनेटके केले. मग त्याच्यातील दुष्टता व पापभिरूता त्यावर प्रकट केली. खचितच सफल झाला तो ज्याने अंत:करणाची शुद्धी केली आणि विफल झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले. (१-१०)

समूदने आपल्या दुर्वर्तनाने खोटे ठरविले. जेव्हा त्या राष्ट्राचा सर्वात जास्त कठोर माणूस चवताळून उठला तेव्हा अल्लाहच्या प्रेषिताने त्या लोकांना सांगितले की खबरदार, अल्लाहच्या उंटिणीला (हात लावू नका) आणि तिच्या पाणी पिण्य़ात (अडथळा बनू नका). परंतु त्यांनी त्याचे म्हणणे खोटे ठरविले आणि उंटिणीला ठार केले. सरतेशेवटी त्यांच्या अपराधापायी त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्यावर अशी आपत्ती कोसळविली की एकाच वेळी सर्वांना जमीनदोस्त केले आणि आपल्या (या कृत्याच्या) कोणत्याही दुष्परिणामाची कोणतीही भीती नाही. (११-१५)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP