भाग दोन - कलम ६

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


पाकिस्तानातून स्थलांतर करुन भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क .

६ . अनुच्छेद ५ मध्ये काहीही असले तरी , जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करुन भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ---

( क ) तिचा अथवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा तिच्या आजा - आजींपैकी कोणाही एकाचा " गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट , १९३५ " ( मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे ) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल ; आणि

( ख ) ( एक ) अशा व्यक्तीने १९ जुलै , १९४८ या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत , आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर ; किंवा

( दोन ) अशा व्यक्तीने १९ जुलै , १९४८ या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत , तिने नागरिकत्वासाठी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणीसंबंधात नियुक्त केलेल्या अधिकार्‍याकडे , त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरुन , अशा अधिकार्‍याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर ,

ती व्यक्ती या संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल :

परंतु , कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP