मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
जातपात गुणकर्मे आली जनतेच...

जय मृत्युंजय - जातपात गुणकर्मे आली जनतेच...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


जातपात गुणकर्मे आली जनतेची एका ।
उच्चनीचता जन्माने हा धरुं नका हे का ॥
सर्वांना सारखे गणा
नका म्हणू अस्पृश्य कुणा
हिंदू तितुका एक ! बंधने भेदाची फेका ।
उच्चनीचंता जन्माने हा धरु नका हेका ॥१॥
एकचि आपुला देव नि देश्
कामापुरते विभिन्न वेश्
देशावरची निष्ठा वेशे विचलीत होते का ?
उच्चनीचता जन्माने हा धरु नका हेका ॥२॥
हिंदुत्वाची विशालता
जात्युच्छेदे स्थिर होतां
होऊ आम्ही बलाढय जगती नसो कुणा शंका ।
उच्चनीचता जन्माने हा धरु नका हेका ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP