हरिपाठ - अभंग २८

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


हरिपाठाचे हे २८ अभंग ज्ञानेश्‍वरमहाराजांनी मोठ्या विश्‍वासानें रचले आहेत.

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वांसे ज्ञानदेवें ॥१॥

नित्यापाठ इंद्रायणी करी तो अधिकारी होईल

नित्यपाठकरीं इंद्रायणीं तीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥

स्वस्थ चित्त असावें

असावें स्वस्य चित्त एकाग्र मन । उल्हासें करुन स्मरण जीवीं ॥३॥

नेमनिष्ठ भाविकला अंतर्बाह्म अंतकाळी व संकटकाळीं हरीच सांभाळील

अंतकळीं तैसा सकटांचे वेळीं । हरी तया संभाळी अंतर्बाह्य ॥४॥

संतसज्जनांनी या ज्ञानाची प्रचीति घेतली, पण आळशी मंदमती कसा तरेल ?

संतसज्जनांनी घेतली प्रचेति । आळशी मंवमति केवि तरे ॥५॥

श्रीगुरुनिवृत्तिनाथांचे प्रमळ वचन श्रवण करुन ज्ञानेश्वर महाराज तत्काळ संतुष्ट झाले.

श्रीगुरुनिवृत्तिवचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP