आनंदलहरी - मनाचें मनपण

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


ज्यासी सदगुरुकृपा होय । त्याचें मनपण विरोनि जाय । संकल्पविकल्पां नुरे ठाय । मिरासी होय मोक्षाचा ॥८०॥

सदगुरुचे कृपेवीण । नव्हे मोक्षाचें साधन । जन्ममरणाचें बंधन । नचुके जाण सर्वथा ॥८१॥

एक गुरुभक्तांतें निंदिती । एक गुरु ह्नणजे काय ह्नणती । जे जे गुरुतें सेविती । तयांसी प्राप्ती काय जाली ॥८२॥

सदगुरुभजनीं लाधलें सुख । तें नेणती अज्ञान मूर्ख । विषयसुखें मातले देख । जन्ममरणाचें दुःख भोगिती ॥८३॥

जैसी नपुंसकासी पद्मिणी । आलिया सुख नुपजे अंतः करणीं । किंवा उलूकास दिनमणी । देखतां नयनीं सुख काय ? ॥८४॥

गर्भांघासी लावण्यता । गर्दभासी सुगंधता । सुकरु मिष्टान्न भोक्ता । हें सर्वथा नघडेचि ॥८५॥

श्वानासी शेज सुमनाची । बधिरासी गोडी कीर्तनाची । रोगियासी मिष्टान्नाची । लागे रुची हें न घडेचि ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP