अवतारवाणी - भजन संग्रह १४

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (१३१)

मायेमाजी झोपून प्राण्या अमोल जन्मा घालवीसी ।

हरिनामावीण पाप सर्व ते जे ते तू सेवन करिसी ।

दुष्टासंगे करिशी प्रीती वैर करिशी संतांसी ।

नर्कवास मनमार्गी तुजला फळ करणीचे भोगीसी ।

नाही गुरुवीण मुक्ती मिळणे कोटी कर्म जरी करिशी ।

जन्म मरण लागे तुजपाठी त्या दुःखाने तु रडशी ।

संतवचन जर नाही मानीले अनुताप अंती तुजला ।

कर्मधर्म या पाशामाजी जखडून घेशी अपणाला ।

समय न गेला आहे अजूनी शरण सदगुरुला येई ।

'अवतार' म्हणे तू ऐक बांधवा भवसागर तरूनी जाई ।

*

एक तूं ही निरंकार (१३२)

सदगुरु पूरा ज्यास मिळाला सर्व भोग त्याचे सरले ।

लावून माथी चरनधुळीला भाग्य तयाचे पालवटे ।

ज्याने आपुला प्रभु जाणीला होईल तो भव सागर पार ।

तोच सुखी या विश्‍वामाजी बाकी सर्व दुःखी संसार ।

दुःख कधी ना येई तयाला गुरुचा वरहस्त असता ।

इहलोकी परलोकी सुखी तो सदैव संगे राही सखा ।

भक्तांचे मुख राहे उज्वल जयजयकर जगी ज्यांचा ।

निदकाचे मुख होईल काळे ताडन करीता यमराजा ।

गुरु भक्तांचा मार्ग वेगळा दुजा मार्ग मनमार्गीचा ।

'अवतार' म्हणे हे संत जनांनो मेळ कधी दोघांचा ।

*

एक तूं ही निरंकार (१३३)

रूप मनोहर यौवन आणि संपत्तीला नाही सुमार ।

प्रणाम करिते दुनिया सरी करिती जरी सारे सत्कार ।

नोकर चाकर यांच्याकडूनी करून येई सारे काम ।

पलंगावरी सुंदर गाद्या सुख निद्रा ऐशो आराम ।

दान धर्मही अमाप केले यश गाईल जरी संसार ।

'अवतार' हरिला जो ना जाणे ऐशा नरा असो धिक्कार ।

*

एक तूं ही निरंकार (१३४)

ठायी ठायी पुशीत आहे ओळख प्रभुची कशी करू ।

जोडीला जो हरिसंगे कोनी जीवन हे बलिदान करु ।

त्याच्या घरच्या होईन चाकर त्याचे भरीन मी पाणी ।

तन मन धन त्याला वाहूनी राहीन मी सेवक बनूनी ।

मान मनाचे त्यागुन सारे घेईन त्याचे दिधले नाम ।

रोम रोम माझ्या देहाचा सदा करील तयास प्रणाम ।

लावूनी त्याच्या चरणधुळीने हे तन माझे धुवीन मी ।

पूर्ण गुरुला शरण जाऊनी मिटवी आपण अपनाला ।

'अवतार' मागुता करी विनंती प्रभुसवे भेटवी मला ।

*

एक तूं ही निरंकार (१३५)

निरंकार सर्वाहुन मोठा नाही जयाचा पारावार ।

जयी तपी संन्याशी कोणी जाणू न शकतो याचे सारे ।

चंद्र सूर्य तारे आकाशी याच्या हुकुमाने फिरती ।

वायु जीव आकाशही याच्या आज्ञेचे पालन करीती ।

जल अग्नी धरती हे तिन्ही हुकमी याच्या वावरती ।

सृष्टीचे या कण कण सारे समर्पित याला होती ।

इच्छी जरी मनाने तर हा क्षणात सृष्टी नष्ट करी ।

येता मनी करी विस्तार मनात येता संहारी ।

नाशिवंत ही सारी माया पवित्र दयाळू तू भगवान ।

म्हणे 'अवतार' गुरुवाचोनी तुझे न होईल उज्वल नाम ।

*

एक तूं ही निरंकार (१३६)

गंगा यमुना स्नान करुनी धुवुनी जर पापे जाती ।

तरी मग सारे जलचर प्राणी कासव बेडूकही तरती ।

स्वप्नमाजी केले कोणी होत नसे ते यथार्थ दान ।

मलीनता जाई न मनाची व्यर्थची आहे ऐसे स्नान ।

कर्मामाजी फसून प्राण्या जीवन व्यर्थ घालवीशी ।

गेला समय न येई हाती अनुतापाने तू रडशी ।

गुरु केवळ धर्माची धरती धर्माची होए शेती ।

गोड फळे जीवन मुक्तीची गुरुसेवक प्रेमे खाती ।

संतांच्या सेवेहुन जगती श्रेष्ठ कर्म आणिक नाही ।

'अवतार म्हणे ज्ञानाहुन उच्च आणिक धर्म दुजा नाही ।

*

एक तूं ही निरंकार (१३७)

काय असे कर्माची नीती भार मस्तकी असे वृथा ।

काय गुढ स्वर्गा नर्काचे काय आत्मा परमात्मा ।

काम क्रोध कशाला म्हणतो काय लोभ अन अहंकार ।

काय त्याग अन योग कोणता काय असे गुरुमत प्रचार ।

बुद्धीला एक प्रश्न विचार शुद्धी तव कोठे गेली ।

पुण्य पाप चक्रात फसूनी भ्रमित अशी तू कां झाली ।

काय घ्यावया आला मानव काय गमवूनी बसलासी ।

कळले ना कळणारही नाही ब्रह्म काय माया कैसी ।

शब्द गुरु अन स्वरुप चेला ओलखी न अंतरी कोणी ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण भेद न जाणु शके कोणी ।

*

एक तूं ही निरंकार (१३८)

न मानीता संतांची वचने सुखशांती ना येई मना ।

परिवर्तन ना होई जीवन संतजनांच्या कूपेवीणा ।

सतसंगाने रुक्ष जीवना सदैव प्रफूल्लता मिळणे ।

दुःख गरीबी नाश पावती सुखशांती पदरी येते ।

खाणे पिने आणी झोपणे जीवनाचा नाही आधार ।

सर्व असो धिक्कार तयाचे जया न चित्ती निरंकार ।

असे जरी राजा सृष्टीचा मुखी परंतु नाही लगाम ।

धन्यवाचूनी वारु जाणा मुखी जयाच्या नाही लगाम ।

एकची असुनी खेळही त्याचा गणती आन दुजी नाही ।

म्हणे 'अवतार' गुरुच देव यांत मूळी शंका नाही ।

*

एक तूं ही निरंकार (१३९)

कर्मी धर्मी जखडून प्राण्या व्यर्थ वेळ कां घालविसी ।

चौर्‍याऐंशीची फांस गळी कां पुन्हां पुन्हां ओढून घेशी ।

होय मुक्त तव आत्मा ज्याने युक्ती आहे काय अशी ।

बेडी केवळ बेडीच आहे लोखंडी वा सोन्याची ।

बंधन मुक्त होणे नाही ज्ञानावाचून कर्मानी ।

अशक्य मिळणे जीवन मुक्ती देवावीण तुजला प्राणी ।

बेडीने बेडी ना तुटते प्रयत्‍न हा करणे बेकार ।

लाख कागदी फुलापासुनी कधीही ना येणार बहार ।

मिळता ज्योत असा ज्योतीला अमर ज्योत होऊन जाते ।

'अवतार सागरी थेंब मिसळती सागर नांव तया मिळते ।

*

एक तूं ही निरंकार (१४०)

ज्याने धरती अग्नी बनविली मधूर अन शीतल पाणी ।

ज्याने जीव आकाश निर्मिले जीवनही दिधले त्यानी ।

लेखक लिहुन थकले महिमा वेद ग्रंथ हरले सारे ।

ज्याने सुंदर वायु दिधले सूर्य चंद्र आणि तारे ।

कान दिले श्रवणासी वचने नेत्र सुमंगल पहाण्याशी ।

सुंदर ऐसे हात बनविले पाय गुरुचे धरण्याशी ।

ज्याने सुंदर पाय बनविले संत संगती जाण्याशी ।

सुंदर ऐशी जिव्हा दिधली सदगुरुचे गुण गाण्याशी ।

दाखवील जर ऐसा स्वामी की न भजावे त्या आम्ही ।

'अवतार' म्हणे मी अशा प्रभुची करील धन्यता क्षणोक्षणी ।

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP